धार्मिक अवहेलनेने अहिल्यानगर मधे तनाव! प्रेषितांच्या नावाच्या अपमानानंतर संगमनेरात पडसाद,

शांतता भंग करण्याचा कट? DySP सोनवणे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन, मुख्य आरोपी सह 29 संशयित ताब्यात;




​संगमनेर/अहिल्यानगर: दि 29 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अहिल्यानगर शहरात (पूर्वीचे अहमदनगर) धार्मिक सलोख्याला गंभीर आव्हान देणारी आणि तेढ निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकांनी मुस्लिम धर्मियांच्या आदरणीय प्रेषितांचे नाव रस्त्यावर रांगोळीने लिहून त्यांची अवहेलना केल्याची तक्रार आहे. या निंदनीय कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या असून, त्याचे तीव्र पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत.

संतप्त झालेल्या संगमनेर शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने डीवायएसपी (DySP) सोनवणे यांना तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे.

​        घटनास्थळी लाठीचार्ज; मालमत्तेचे मोठे नुकसान

निवेदनात नमूद केल्यानुसार, या कृत्याचा विरोध दर्शवण्यासाठी मुस्लिम समाजबांधव रस्त्यावर उतरले. मात्र, याच दरम्यान जमावावर लाठीचार्ज करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या संघर्षामुळे खाजगी तसेच शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेने शहरातील शांतता भंग झाली असून, सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.

​     राष्ट्रीय एकात्मतेला धोका': कठोर कारवाईची मागणी

मुस्लिम समाजाने भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता, समता आणि बंधुता या मूल्यांचा आधार घेत घटनेची तीव्रता प्रशासनासमोर मांडली आहे. सदर बाब ही केवळ धार्मिक तेढ निर्माण करणारी नाही, तर ती राष्ट्रीय एकात्मतेला देखील धोका निर्माण करणारी असल्याने याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही," असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
​शहरात शांतता भंग करणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या संबंधित समाजकंटकांवर त्वरित अजामीनपात्र (
Non-bailable) कलमांखाली कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी डीवायएसपींकडे करण्यात आली आहे.
​धार्मिक अवहेलनेच्या या कृत्यामुळे अहिल्यानगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर सदर प्रकरणात वेगवेगळे गुन्हे देखील झाले आहेत, रांगोळी काढणाऱ्या मुख्य गुन्ह्यातील आरोपी
संग्राम आसाराम रासकर याला पोलिसांनी अटक केली असून लाठीचार्ज नंतर जमावातील तब्बल 29 संशयित आरोपी देखील ताब्यात घेतल्याचे प्रेस नोट च्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने सांगितले आहे त्यामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणात आणखी कोणती कठोर भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget