राजकीय दबावामुळे संगमनेरची 'सुसंस्कृत' ओळख धोक्यात!

रामदास कोकरे गेले,दयानंद गोरे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचे फलक झळकले, पोलीस खात्यातही खळबळ;



​संगमनेर,प्रति: दि.27 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, एकेकाळी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि शैक्षणिक केंद्र म्हणून गौरवल्या जाणाऱ्या संगमनेर शहराची प्रतिमा आता राजकीय दबावामुळे धोक्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील प्रशासकीय कामकाजात वाढलेला राजकीय हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांवर होणारा मानसिक व आर्थिक दबाव, यामुळे शहरातून अनेक कार्यक्षम अधिकारी काढता पाय घेत आहेत. या परिस्थितीचा थेट परिणाम शहराच्या विकासावर आणि कायदा-सुव्यवस्थेवर होत आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनीही याच दबावाला कंटाळून संगमनेर सोडले. त्यांची नियुक्ती शहरात शिस्त आणण्यासाठी झाली होती, मात्र त्यांनाही राजकीय शक्तीपुढे नमते घ्यावे लागले. त्यांच्या जाण्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.याआधीही, याच प्रकारच्या दबावामुळे तहसीलदारांना तीन महिन्यांची रजा घ्यावी लागली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या हस्तक्षेपामुळे नवीन रुजू झालेल्या पोलिस निरीक्षकांना पहिल्याच दिवशी 'खरपूस समाचार' मिळाल्याने, ते किती मनापासून काम करतील, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. आता तर, उपविभागीय पोलीस अधिकारी देखील बदलीच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये नकारात्मकता पसरली असून, आगामी काळात शहरात चांगले अधिकारी येण्यास कचरतील, अशी भीती व्यक्त होत आहे. हे सर्व पाहता, संगमनेरच्या शांत आणि सुसंस्कृत प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एमडी पावडर, नशेचे इंजेक्शन, कुत्ता गोळी, गांजा, गुटखा अशा विविध अवैध धंद्याने शहराला विळखा घातला आहे, तर राजकीय स्वार्थासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या चुकीच्या प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही तर, शहराची प्रगती थांबेल आणि सामाजिक सलोखाही बिघडण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवणे ही काळाची गरज बनली आहे.राज्यातील अनेक शहरांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कोकरे संगमनेरमध्ये मात्र आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाहीत. ते कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी मार्ग काढतील, अशी अपेक्षा संगमनेरकरांना होती. त्यांनी सुरुवातीपासून तसे प्रयत्नही केले, मात्र त्यांच्या कामकाजात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ते येथे फारशी प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. तसेच, शहरातील फ्लेक्स कारवाईसह अन्य काही विषयांवरूनदेखील ते अडचणीत सापडले असल्याची चर्चा शहरात होती. यामुळे कोकरे यांनी शहरातील फ्लेक्स कारवाईवर मौन बाळगले होते. त्यांच्या कार्यकाळात शहरात सर्वत्र फ्लेक्स युद्ध रंगले होते. असे असले तरी, एक चांगला अधिकारी म्हणून आपली प्रतिमा त्यांनी जनसामान्यांमध्ये निर्माण केली होती.कोकरे यांचा संपूर्ण कार्यकाळ प्रशासकीय कालावधीत गेल्याने त्यांचा नगरसेवकांशी फारसा संबंध आला नाही. त्यामुळे थेट निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती, मात्र त्यांच्या निर्णयाला सातत्याने लगाम घातला गेल्याचे बोलले जाते. त्यातच संगमनेरच्या बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याचे देखील चर्चा होती. अखेरीस राज्य शासनाने कोकरे यांची संगमनेरमधून बदली केली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर पाठविण्यात आले असून, त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी दोन वर्षांसाठी आहे. कोकरे यांच्या बदलीने संगमनेरचे मुख्याधिकारी पद रिक्त झाले असून, या पदावर शासनाने अद्याप अधिकृतपणे कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. मात्र अकलूज नगर परिषदेत वारकरी संप्रदायात आपला ठसा उमटविलेले दयानंद गोरे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनचे शुभेच्छा फलक झळकले आहे तर संगमनेरच्या पोलीस खात्यातही बदलीच्या वाऱ्याचं तुफान उठल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत,

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget