राजहंस दूध संघाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते,राजहंस संघाचे वैशिष्ट्य आजही गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हेच आहे; 


​संगमनेर प्रति: दि 12 सप्टेंबर2025 रोजी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (राजहंस) ची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी खास उपस्थिती लावून सभासद, दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
​यावेळी, राजहंस दूध संघाला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थांचा आणि सर्वाधिक वैयक्तिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. हा सत्कार सोहळा दूध उत्पादकांच्या योगदानाला गौरवणारा होता.

​         दूध व्यवसाय संगमनेरचा आधारस्तंभ

याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात दूध व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून, तो आता येथील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार बनला आहे. राजहंस दूध संघ गोरगरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध संघ नेहमीच विविध योजना राबवत असतो. केवळ उच्चांकी भावच नाही, तर दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमुळेही राजहंस संघाने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे.
​थोरात यांनी पुढे सांगितले की, आज तालुक्यात दररोज तब्बल नऊ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते, हे येथील कष्टाळू शेतकऱ्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. गुणवत्ता हीच या तालुक्याची ओळख आणि अभिमानाचे प्रतीक आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात दूध व्यवसायाचा पाया रचला, ज्यामुळे तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधार मिळाला असुन राजहंस दूध संघाची ५० वर्षांकडे होत असलेली वाटचाल हि निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे. सहकारी दूध संघामुळे खाजगी दूध संस्थांवर नियंत्रण राहते आणि शेतकऱ्यांचे हित जपले जाते, असे थोरात यांनी अधोरेखित केले. त्यामुळे, सर्वांनी मिळून या संघाचे जतन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. राजहंस संघाचे वैशिष्ट्य आजही गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हेच आहे,

      या मांन्यवर मंडळींची होती उपस्थिती

कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते तर व्यासपीठावर मा. आ.डॉ. सुधीरजी तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर,अँड माधवराव कानवडे, सौ संगमनेर नगरपालिकेच्या प्रथम महिला मा.नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, पांडुरंग पा. घुले, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, लहानभाऊ गुंजाळ, आर.बी राहणे, इंद्रजीत भाऊ थोरात, अजय फटांगरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, के. के. थोरात, गणपतराव सांगळे, रामदास पा वाघ, सुभाष आहेर, सुनील कडलग, अविनाश सोनवणे, शेळी मेंढी पालन संघाचे डॉ गंगाधर चव्हाण, दूध संघाचे संचालक, विलास वरपे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू पा. ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, सौ प्रतिभा जोंधळे, भारत शेठ मुंगसे, डॉ. प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी,आदी सभासद शेतकरी बांंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget