नागरीकांची तक्रार मिळताच गुड्डू इंजिनिअर यांनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. प्रशासकीय स्तरावर सतत पाठपुरावा केल्यामुळे काही तासांतच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि काम पूर्ण केले. कोणतेही राजकीय पद नसतानाही वॉर्डातील रस्ते, नाले आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर त्यांचा सक्रिय सहभाग वाखणण्याजोगा आहे.
समाजहिताची कामे करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते, तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. नगरपालिकेतील कामे असोत, हॉस्पिटल किंवा पोलीस स्टेशनशी संबंधित काम असो, मी सदैव नागरिकांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा लावून उभा आहे. असे आवाहन मुजम्मिल शेख उर्फ (गुड्डू) इंजिनिअर यांनी केले आहे. सध्या लखमिपुरा भागात गुड्डू इंजिनिअर यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. रस्ते, नाले आणि सामाजिक हिताच्या कामात त्यांचा असलेला पुढाकार हा इतर कार्यकर्त्यांसाठी आदर्श ठरत आहे.
निवडणुकीच्या काळात प्रभाग १० मध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते. विरोधक आणि काही राजकीय पंडित नूरमोहम्मद शेख यांच्यासोबत असलेल्या महिला उमेदवाराच्या पराभवाच्या शर्यती लावत होते. मात्र, मतदानाचा दिवस आणि त्यानंतर आलेल्या निकालाने सर्वांचे अंदाज धुळीस मिळवले. शकिला इलियास बेग यांच्या रूपाने एका सामान्य चेहऱ्याला सोबत घेऊन, कोणत्याही दगाफटक्याशिवाय नूरमोहम्मद शेख यांनी ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवली आणि जिंकूनही दाखवली.
या निकालात नूरमोहम्मद शेख यांना २०१६ मते मिळाली, तर त्यांच्या सहकारी शकिला बेग यांनी १३३१ मते घेत अनपेक्षित विजय संपादन केला. विशेष म्हणजे, केवळ स्वतःचा विजय न पाहता, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मैथिली तांबे यांना या प्रभागातून तब्बल २८७० मतांचे मोठे मताधिक्य मिळवून देण्यात शेख गणी हाजी, माजी उपनगराध्यक्ष इम्रान गणी शेख आणि नूरमोहम्मद शेख यांची टीम यशस्वी ठरली. या विजयामागे गेल्या ९ वर्षांपासून नगरसेवक म्हणून नूरमोहम्मद शेख यांनी केलेली जनसेवा आणि नेत्यांचे पाठबळ कारणीभूत ठरले असल्याचे दिसून आले आहे.त्यातच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंबीर नेतृत्व आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा दांडगा जनसंपर्क.आमदार सत्यजित तांबे यांचे '२.० व्हिजन' आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मागील कामांची पावती.आणि किंग मेकरच्या भुमिकेत शेख गणी हाजी आणि इम्रान गणी शेख यांची सूक्ष्म नियोजनातील खंबीर साथी मुळेच.
विशेष : मागील पंचवार्षिक मध्ये एका सर्वसाधारण महिलेच्या नंतर पुन्हा शकिला बेग यांच्या वचनपूर्तीचा इतिहास रचला गेला मागील निवडणुकीत मतदारांनी मागिल काळातही एका सर्वसामान्य महिलेला नगरसेविका बनवून सर्वांना चकित केले होते. तोच इतिहास त्यांनी २०२५ मध्ये शकिला बेग यांच्या विजयाने पुन्हा गिरवला आहे. राजकारण किंवा समाजकारणाशी थेट संबंध नसलेल्या महिलेला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणून नुरमहंमद शेख आणि हाजी परिवाराने आपल्या शब्दाची पक्की ओळख करून दिली आहे.
त्यामुळे संस्थेच्या आर्थिक स्थितीबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे: एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी काढल्याने पतसंस्थेच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे चेअरमनचा दावा हा विरुद्ध वास्तव तर नाही ना.कारण पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादापा तथा काका कोयटे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या ४ दिवसांत पतसंस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल रू.३ कोटी ८० लाख रुपयांची वाढ झाली आहे, जो ठेवीदारांचा संस्थेवरील दृढ विश्वास दाखवतो.
मात्र, एका बाजूला लाखोंच्या ठेवी एकाच दिवसात काढल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला रू ३.८० कोटींची वाढ झाल्याचा चेअरमनचा दावा संभ्रम निर्माण करणारा आहे. ठेवीदारांची भीती आणि श्रीरामपूर शाखेतील गर्दी हे वास्तव समोर असताना, पतसंस्थेच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या खुलाशांवर आता किती लोक विश्वास ठेवतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि त्यातच कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आणि निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार हे कोपरगाव चे राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते काका कोयटे यांच्या नेतृत्वातले आहे अस असताना विरोधकांना आयतेच भांडवल मिळाल्याची देखील जोरदार चर्चा कोपरगाव शहरात सुरू आहे.
तर हिच चर्चा निवडणुकीच्या राजकीय क्षेत्रात मोठी कायापालट करेल अशी चर्चा नागरिकांमध्ये एकंदरीत सुरू आहे...
त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार फैरी मध्ये समता पतसंस्थेवर कोणता नेता किती बोलणार आणि बोलणार तर किती घोटाळे उघड होणार किंवा ह्या घोटाळ्यांना टाळेलागणार कि बँकेलाच टाळे लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे,
या गंभीर समस्येबाबत आ. अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी निवेदन देऊन या प्रमुख मागणीकडे परिवहन मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले परिवहन मंत्र्यांनी आमदार खताळ यांच्या मागणीची गंभीर दखल घेत तसेच प्रवासी वर्गाचे होणारे हाल लक्षात घेऊन शिवनेरी आणि विना वाहक बसला संगमनेर आगारात थांबा देण्याबाबतच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत या निर्णया मुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होऊन पुणे-नाशिक मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या तातडीच्या निर्णया बद्दल आ खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहे.
संगमनेर तालुक्यातील तसेच संपूर्ण राज्यातील कोट्यवधी शेतकरी आणि जमीन धारक अनेक वर्षे अडचणीत होते. जमीन विभागणी, नोंदणी, कर्ज प्रक्रिया, हक्क नोंदी होत नव्हत्या याबाबत आपण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडला होता. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुकडेबंदी विधेयक मांडण्यात आले आणि त्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली त्यामुळे आता कोट्यावधी लोकांच्या जमिनीचे वाद, तुकडेबंदीतील अडचणी नोंदणी प्रक्रिया यातील गुंतागुंत दूर होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील असे मत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले आहे,आ. खताळ; महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
