शिर्डी (प्रति: दि 24 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पवित्र शिर्डी नगरीत हॉटेलच्या आडून सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार (वेश्याव्यवसाय) प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना शिर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जेरबंद केले आहे. या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्ह्याला हे कलम लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे आता आरोपींना किमान वर्षभर जामीन मिळणे अशक्य झाले आहे.दिनांक 19/11/2025 रोजी पिंपळवाडी रोडवर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस व विशेष पथकाने पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा येथे छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत अमोल भिमा भोसले (वय २४) आणि गणेश सीताराम कानडे (वय ४१) या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली होती. साधारणपणे वेश्याव्यवसायासारख्या (पिटा) गुन्ह्यात आरोपी ८ ते १० दिवसांत जामिनावर बाहेर येतात. मात्र, या प्रकरणातील आरोपी अमोल भोसले आणि गणेश कानडे हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.ज्यामधे अमोल भोसले या आरोपीवर यापूर्वी ३ गुन्हे दाखल. तर गणेश कानडे या आरोपीवर: यापूर्वी ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याला अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी मंजुरी दिली. कलम १११: 'मोक्का'सारखीच कठोर शिक्षा नवीन कायद्यातील कलम १११ हे खास करून संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे.
--------या कलमांतर्गत काय आहे शिक्षा----------- १) शिक्षा: गुन्हेगारांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. २) जामीन: हे कलम लागल्यामुळे आरोपींना आता सहजासहजी जामीन मिळणार नाही. किमान एक वर्ष त्यांना कोठडीतच राहावे लागेल. ३) अंमलबजावणी: जिल्ह्यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पहिल्यांदाच या प्रभावी कलमाचा वापर करून पोलिसांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. पोलीस प्रशासनाचा कडक इशारा "कोणत्याही परिस्थितीत शहरात अनैतिक व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही," असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे शिर्डीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.-----------------------------
👉------💐 पोलिसांचे कौतुकच 💐 --------🙏
तर दुसरीकडे मात्र या कारवाईचे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तोंड भरून कौतुक देखील केले जात आहे कारण या कारवाईमध्ये सदरचे कलम या गुन्ह्याला लावले नसते तर मात्र आरोपी आठ ते दहा दिवसात जामिनावर बाहेर आले असते पुन्हा तेच धंदे सुरू झाले असते मात्र वेश्याव्यवसाय सारख्या गुन्ह्याला सदरचे कलम अहिल्यानगर जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच लावण्यात आले आहे आणि नवीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यातून दिसून आली आहे, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि शिर्डी पोलीस पथकाने केली आहे.
Post a Comment