आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण आणि सक्रिय पाठपुराव्यामुळेच ही रखडलेली विकासकामे आज प्रत्यक्षात सुरू झाली;
संगमनेर:प्रति: दि 23 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,संगमनेरमधील विकासकामांवरून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे उघड झाला आहे. वर्षानुवर्षे फाईल मध्ये धूळ खात पडून असलेली कामे आज प्रत्यक्ष जमिनीवर दिसू लागली, तेव्हाच काही तथाकथित नेत्यांना अचानक विकासाची आठवण झाली. याच क्षणापासून श्रेय लाटण्याची घाई सुरू झाली असून हा प्रकार म्हणजे संगमनेरच्या जनतेच्या बुद्धिमत्तेचा उघड अपमान असल्याची टीका युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सुशील शेवाळे यांनी केली युवा सेनेच्या वतीने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की नवीन लोक प्रतिनिधी आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण आणि सक्रिय पाठपुराव्यामुळेच ही रखडलेली विकासकामे आज प्रत्यक्षात सुरू झाली आहेत, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. केवळ कागदा वर मंजुरी मिळवून विकास झाल्याचा गवगवा करता येत नाही. निधी वेळेत उपलब्ध करून घेणे, प्रशासकीय अडथळे दूर करणे, कामे सुरू करणे आणि जनतेला प्रत्यक्ष दिलासा मिळवून देणे हेच खरे नेतृत्व असते.विकास कामे मंजुरी असूनही इतकी वर्षे का रखडली? जनतेला त्रास होत असताना तेव्हा पुढाकार घेण्याचे धाडस कुणी का दाखवले नाही? याचे उत्तर आजही जनतेला मिळालेले नाही. आज जेव्हा विकासकामे प्रत्यक्ष मार्गी लागत आहेत, तेव्हा जुन्या फाईली हातात घेऊन श्रेय घेण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामांवर स्वतःचे नाव चिकटवण्याची ही मानसिकता म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा कळस आहे.धमक्या, आक्रमक भाषा आणि खोटे दावे करून संगमनेरची जनता घाबरणारी नाही. आता जनता कागदी मंजुरीवर विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर सुरू असलेल्या कामांवर विश्वास ठेवते. काम शून्य आणि बोलबच्चनगिरी प्रचंड अशा राजकारणाला आता संगमनेरमध्ये माफी नाही नसल्याचा खणखणीत इशारा त्यांनी दिला
...........।।।।।।।।....चौकट....।।।।।।।।..................... शिवसेना ही केवळ बोलणारी नव्हे, तर काम करणारी संघटना आहे. खोट्या श्रेयवादाला आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना यापुढे उघडपणे आणि ठोस शब्दांत उत्तर दिले जाईल. अन्यथा जनता योग्य वेळी योग्य निर्णय देईल, हे निश्चित आहे, श्री सुशील शेवाळे अध्यक्ष -संगमनेर तालुका युवा सेना
Post a Comment