उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण. संगमनेरच्या विकासातही त्यांचे मोलाचे सहकार्य. संगमनेरमध्ये गुरुवारी श्रद्धांजलीचे आयोजन


संगमनेर प्रति: दि 3 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यासह संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता,  मालपाणी लॉन्स येथे सर्वपक्षीय आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात व  शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी  दिली आहेया सभेमध्ये संगमनेर शहर आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. अजितदादा पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर असलेली पकड आणि विकासकामांचा धडाका यामुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. संगमनेरच्या विकासातही त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते, याची आठवण या निमित्ताने जनमानसात व्यक्त होत आहे.

-------------------------- चौकट ----------------------------
कामाचा माणूस म्हणून ओळख असलेले आमचे नेते अजितदादा यांच्या जाण्याने आमची खूप मोठी हानी झाली आहे, आम्ही आमचा खंदा मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेला उपस्थित राहावे,  

कपिल पवार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांचे आवाहन

-------------------------------------------------------------------

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget