दाखल तक्रारीनुसार सोशल मीडिया पोस्टमध्ये आमदार अमोल खताळ यांचा फोटो लावून आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला आहे. तसेच संगमनेर नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने पोस्ट पूर्णपणे चुकीची आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याचा मुख्य उद्देश आमदार खताळ यांना बदनाम करण्याचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 


नाशिकमध्ये दरफलक, मग शिर्डीत मनमानी का?
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांचा खर्च; अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी!
सर्वप्रथम ज्या ज्या प्रभागांमध्ये जनसामान्य नागरीकांच्या मुलभूत सुविधा, समस्या,रस्ते,पाणी, वीज अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात अकार्यक्षम असल्याच्या तक्रारी वाढल्याने काही अकार्यक्षम नगरसेवकांनी आता तर प्रभाग क्रमांक बदलून इतर प्रभाग क्रमांकात प्रवेश करत असल्याचे देखील सामोरे येत आहे.आपल्या पुर्वीच्या जुन्या प्रभागा मध्ये सामाजाभिमुख कार्याचे गेल्या पाच वर्षात कोणतेच दिवे लावू शकले नाही ते आता नव्या प्रभागात काय दिवे लावणार ? याकरिता जागृत मतदार बंधू भगिनींनी मतदान करताना सर्वप्रथम आपल्या समस्या सोडविण्यात निवडणुकी अगोदर जो सक्षम असेल त्यालाच मतदान करावे, इतरांच्या भूलथापांना बळी पडून चिरीमिरी घेऊन काही साध्य होणार नाही, पाच वर्ष पुन्हा पश्चचतापशिवाय काहीच उरणार नाही,आपण निवडून दिलेला नगरसेवक निवडून आल्यावर आपल्या प्रभागामध्ये लवकर फिरकणार नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे, हे कुणालाही उद्देशून म्हटलेले नसून कुणी वैयक्तिकरित्या घेऊ नये, मला माझे मत परखड मांडण्याचा अधिकार असल्याने ते मी सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी यांच्या माहितीसाठी माझे परखड मत मांडत आहे. आणी त्यात गैर ते काय? म्हणून "ताई - माई, अक्का, यावेळी खरा विचार करा पक्का !,भिकार - भंगारांना सोडा,आणि निष्ठावंतांना मारा शिक्का तरच आपल्या देशात लोकशाही टिकेल एकढ मात्र नक्की,
ही एक प्रकारे 'हप्ता वसुली सुरू असून, पैसे न दिल्यास हॉटेलमधील कचरा न उचलण्याची धमकी दिली जात आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, संबंधित ड्रायव्हरने एका हॉटेलमध्ये घुसून तेथील कारागिरांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ड्रायव्हरच्या या गुंडगिरीमुळे समस्त हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या प्रकाराला कंटाळून शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तसेच, हॉटेल व्यावसायिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयातही अर्ज देऊन पाठिंबा मागितला आहे, कारवाई न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आरोग्य अधिकारी पठाण साहेब यांनी ड्रायव्हरला पाठीशी न घालता त्वरित कारवाई करावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.शहरात अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या कचऱ्याचे ढीग पडलेले असून, ठेकेदाराकडून पालिका नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कचरा संकलनाचा ठेका कायमचा रद्द करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन, गुंड प्रवृत्तीच्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांन मधून होत आहे.
पहिला कांताबाई सातारकर स्मृति पुरस्कार
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना आमदार खताळ यांच्या कार्यशैलीचे अनोख्या शब्दांत कौतुक केले. सरकारमधील मंत्र्यांकडून कामे कशी दादागिरीने मंजूर करून घ्यायची, हे अमोल खताळ यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अंगावर 'जळू' जसा चिकटून राहतो, तसा राजकीय 'जळू' अमोल खताळ यांच्याकडे आहे," असे सांगत त्यांनी खताळ यांची मागणी नाकारणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. युवकांच्या रोजगारासाठी खताळ यांची असलेली धडपड पूर्णत्वास नेण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासनही सामंत यांनी दिले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदार खताळ यांच्या माध्यमातून लोककलावंतांचा झालेला सन्मान सोहळा तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरला असल्याचे गौरवोद्गार काढले. बाकीचे उद्योग तालुक्यात आता बंद झाले, असा टोला लगावत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला आणि औद्योगिक वसाहतीसाठी आपणही पाठपुरावा करू, असे जाहीर केले. तसेच, जिल्ह्याच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मराठी भाषा व सांस्कृतिक भवन उभारणीसाठी जागा देण्याची मागणी त्यांनी केली. आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात नवसांस्कृतिक पर्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले आणि औद्योगिक वसाहतीच्या घोषणेला मंत्री सामंत यांनी मूर्त स्वरूप देण्याची मागणी केली. सोहळ्यात व्यासपीठावर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश चंदनशिवे, शाहीर विठ्ठल उमप यांच्या कन्या संगीता आणि कविता उमप, प्रा. एस. झेड. देशमुख, बापुसाहेब गुळवे, डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व साहित्य-कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोक भाई बागुल यांच्या महत्वपूर्ण शिफारसीनुसार ही नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे जिल्हाप्रमुख ऍड. प्रशांतजी वरपे यांनी शेख बरकत अली यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. 27 ऑक्टोबर 2025 रोजी श्रीरामपूर येथील व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत या निवडीची घोषणा करण्यात आली होती.
दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी ॲड. संदीप वरपे यांच्या कार्यालयात शेख बरकत अली यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस अशोक भाई बागुल, अल्पसंख्याक सेलचे श्रीरामपूर शहराध्यक्ष नाझिश शाह, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष संदीप पवार आणि ठेकेदार पंडितराव आदी मान्यवर उपस्थित होते. शेख बरकत अली यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेत नवा उत्साह संचारला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लकी सेठी, ॲड. राजेश बोर्डे, डॉक्टर बडाख, तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष नाजिश शाह, शहर उपाध्यक्ष जुनेद भाई शेख, अल्पसंख्याक सेलचे शहर कार्याध्यक्ष मोहसीन जहागीरदार आणि साजिद भाई शाह, समाजसेवक मतीन भाई शाह, शिक्षक संघटनेचे नेते रावसाहेब पवार, तालुका अध्यक्ष शिवाजी गोसावी,यांच्यासह महाराष्ट्र लघु वृत्तपत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा उपाध्यक्ष शौकत पठाण, सौ. समिना शेख, सौ. जयश्री गायकवाड, सौ. सुप्रिया घोलप, सौ. बानूबी शेख आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह, सुरेश तडके, वडीतके, सुभाष हळनोर, राजू थोरात, हनुमंत खरात, नाना तुपे, इसाक पटेल, वाल्मीक ढोक चवळे, संदीप पवार, राज मोहम्मद शेख, अकबर भाई शेख, एजाज सय्यद आदींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.