



आकाश शिर्डी बसस्टँडवर प्रवासी बुकींगचे काम करायचा. भिक्षा मागणाऱ्या अनोळखी महिलेला त्याची सततची चेष्टा करण्याची सवय होती. ती त्याला वारंवार 'अरे तू माझा नवरा आहे, असे लोकांमध्ये ओरडून बोलत असे. यामुळे होणारी असह्य बदनामी आणि लोकांकडून होणारी चेष्टा आकाशला सहन झाली नाही. या विकृत मानसिकतेतून त्याने महिलेचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.आणि 17 मार्च 2023 रोजी त्याने आपल्या मोपेड (MH17BW6950) वर बसवून तिला सावळीविहीरच्या निर्मनुष्य खाणीत नेले. तेथे कोणताही विचार न करता तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह खाणीच्या खोल पाण्यात फेकून दिला. दोन वर्षांपर्यंत त्याने हा गुन्हा पोटात दडवून ठेवला होता. एका निरपराध महिलेचा खून केवळ सामाजिक चेष्टेच्या रागातून झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. आरोपी आकाश कपिले यास दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं 287/ 2024 भादवि कलम 302 / 201 प्रमाणे दाखल प्रकरणी हजर करण्यात आले आहे तर कायद्याच्या कचाट्यातून त्याची सुटका होणार नाही, अशी खात्री पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे तर सदरची दमदार कारवाई ही अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली केले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे
या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी मातेनेच बळ द्यावं, ही त्यांची कळकळीची प्रार्थना होती. त्यांच्या या भूमिकेमुळे, एका लोकनेत्याची जनतेप्रती असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येते. बाळासाहेब थोरात यांनी केवळ दर्शन घेऊन शांत बसले नाहीत. त्यांच्यासोबत नाशिक पदवीधरचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे डॉ. जयश्री थोरात निखिल पापडेजा यांसारखे महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते. हा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर जनतेच्या दुःखात सहभागी होण्याची आणि त्यांना आध्यात्मिक बळ देण्याची एक गंभीर कृती होती.त्यांनी मातेच्या चरणी सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचीही प्रार्थना केली.
थोडक्यात, संकटात सापडलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तात्काळ सरकारी मदत कधी मिळणार? हा कळीचा प्रश्न असताना, थोरात साहेबांनी मात्र मातेच्या आशीर्वादाने त्यांना नैतिक आणि मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रशासनाने या 'आध्यामिक आधारा'ला 'आर्थिक मदतीची' जोड देणं अपेक्षित आहे.
बाळासाहेब थोरात हे पहाटेपासूनच परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते आणि तातडीने प्रशासनाला मदतीसाठी कडक सूचना दिल्या होत्या.तर त्यांच्या एका हाकेवर कार्यकर्ते सकाळपासूनच सादतपूरमध्ये तळ ठोकून मदतीसाठी उतरले असल्याचेही एकंदरीत चित्र दिसून आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधाराचा शब्द दिला. तसेच थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनीही तातडीने गावात धाव घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.त्यामुळे या दुःखाच्या क्षणी बाळासाहेब थोरात यांनी राजकीय सांत्वनाची औपचारिकता टाळली, आणि केवळ मायेचा आधार देण्याचे काम केले असल्याचं बोललं जातं आहे. 
बंडूशेठ यांचा व्हॉट्सॲप ग्रुप नव्हे तर हक्काचं व्यासपीठच आहे संजय क्षत्रिय हे केवळ संगमनेर तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि सामाजिक कार्यामुळे परिचित आहेत. त्यांनी सुरू केलेला सौ शहरी तो एक संगमनेरी हा व्हॉट्सॲप ग्रुप आज संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील सर्व समाज बांधवांसाठी हक्काचं व्यासपीठ बनलं आहे. वेगवेगळ्या धार्मिक विचारधारेचे लोक, विविध शासकीय प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, तसेच विविध पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, नेते आणि कार्यकर्ते यांना एकाच व्यासपीठावर आणून आपले विचार मांडण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. बहुतांश शहरातील व तालुक्यातील विविध समस्या याच ग्रुपच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न बंडूशेठ नेहमी करत आले आहेत. त्यांचा हा समन्वयवादी आणि सर्वसमावेशक स्वभावच त्यांच्या निवडीमागे महत्त्वाचा ठरला आहे. सय्यद बाबांचा उरूस हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जागतिक प्रतीक आहे.
संगमनेर शहराच्या मध्यभागी असलेले हजरत सय्यद शहा बाबा दर्गा हे केवळ (देवस्थान )नसून ते हिंदू-मुस्लीम ऐक्याचे महत्त्वपूर्ण आणि जागृत प्रतीक म्हणून ओळखले जाते. या दर्ग्याचा उरूस (जत्रा ) हा संगमनेरच्या ऐतिहासिक नगरीतील एक मोठा आणि महत्त्वाचा सोहळा मानला जातो, ज्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळते. सन 2026 च्या उर्स कमिटीवर मोगलपुरा ट्रस्टने अध्यक्ष व सदस्यांची निवड करताना सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य कायमस्वरूपी टिकून राहावे या उदात्त हेतूने संजय क्षत्रिय उर्फ बंडूशेठ यांची निवड केली. या निवडीमुळे दर्गा कमिटीमध्ये आता समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व झाले आहे. सय्यद बाबा ऊस कमिटी 2026 करिता अध्यक्ष शेख गफ्फार अब्दुल लतीफ यांची तर कमेटी सदस्य पदी बंडूशेठ क्षत्रिय यांच्या या ऐतिहासिक निवडीमुळे संगमनेर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले बघण्यास मिळाले आहे. त्यांचे चाहते आणि हितचिंतक सोशल मीडियासह (फेसबुक, व्हॉट्सॲप) तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ही निवड केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, सामाजिक सलोखा आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा गौरव असल्याचे मानले जात आहे. एवढं मात्र नक्की,
आ खताळ म्हणाले की आद्य क्रांति कारक राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढा दिला त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.राजे उमाजी नाईकांनीफक्त रामोशी समाजबांधवांना न्याय दिला नाही तर सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नकेला आहे. त्यामुळे रामोशी समाजबांधवांनी आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचा आदर्श घेऊन पुढं मार्गक्रमण करावे ज्या पद्धतीने रामोशी समाज बांधवांनी एकत्रित येत गनिमी काव्याने ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष ळरत त्यांना सळो की पळो करून सोडले .तसाच गनिमी कावा या समाजबांधवांनी विधानसभा निवडणुकी मध्ये वापरत आम्ही कोणाच्या दबावाला व दहशतीला घाबरणारे नाही हे दाखवून देत हा सर्व समाज महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला. गेली कित्येक वर्ष केंद्रात व राज्यात विशेषता संगमनेर मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. त्या वेळी फक्त ठराविक महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे संगमनेर मध्ये साजरे होत होते.मात्र या तालुक्यात परिवर्तन झाल्या नंतर सर्वच राष्ट्रमहापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्याचे भाग्य मला मिळालेआहे प्रत्येक समाजघटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम आपण करत आहोत. तुम्ही माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही असाही विश्वास आमदार खताळ व्यक्त केला .जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रोहिदास मदने शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले तर आभार मच्छिंद्र गुळवे यांनी मानले हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला पुरुष तरुण यांनी विशेष परिश्रम घेतले
याआधीही, याच प्रकारच्या दबावामुळे तहसीलदारांना तीन महिन्यांची रजा घ्यावी लागली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या हस्तक्षेपामुळे नवीन रुजू झालेल्या पोलिस निरीक्षकांना पहिल्याच दिवशी 'खरपूस समाचार' मिळाल्याने, ते किती मनापासून काम करतील, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. आता तर, उपविभागीय पोलीस अधिकारी देखील बदलीच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये नकारात्मकता पसरली असून, आगामी काळात शहरात चांगले अधिकारी येण्यास कचरतील, अशी भीती व्यक्त होत आहे. हे सर्व पाहता, संगमनेरच्या शांत आणि सुसंस्कृत प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एमडी पावडर, नशेचे इंजेक्शन, कुत्ता गोळी, गांजा, गुटखा अशा विविध अवैध धंद्याने शहराला विळखा घातला आहे, तर राजकीय स्वार्थासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या चुकीच्या प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही तर, शहराची प्रगती थांबेल आणि सामाजिक सलोखाही बिघडण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवणे ही काळाची गरज बनली आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कोकरे संगमनेरमध्ये मात्र आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाहीत. ते कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी मार्ग काढतील, अशी अपेक्षा संगमनेरकरांना होती. त्यांनी सुरुवातीपासून तसे प्रयत्नही केले, मात्र त्यांच्या कामकाजात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ते येथे फारशी प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. तसेच, शहरातील फ्लेक्स कारवाईसह अन्य काही विषयांवरूनदेखील ते अडचणीत सापडले असल्याची चर्चा शहरात होती. यामुळे कोकरे यांनी शहरातील फ्लेक्स कारवाईवर मौन बाळगले होते. त्यांच्या कार्यकाळात शहरात सर्वत्र फ्लेक्स युद्ध रंगले होते. असे असले तरी, एक चांगला अधिकारी म्हणून आपली प्रतिमा त्यांनी जनसामान्यांमध्ये निर्माण केली होती.
कोकरे यांचा संपूर्ण कार्यकाळ प्रशासकीय कालावधीत गेल्याने त्यांचा नगरसेवकांशी फारसा संबंध आला नाही. त्यामुळे थेट निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती, मात्र त्यांच्या निर्णयाला सातत्याने लगाम घातला गेल्याचे बोलले जाते. त्यातच संगमनेरच्या बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याचे देखील चर्चा होती. अखेरीस राज्य शासनाने कोकरे यांची संगमनेरमधून बदली केली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर पाठविण्यात आले असून, त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी दोन वर्षांसाठी आहे. कोकरे यांच्या बदलीने संगमनेरचे मुख्याधिकारी पद रिक्त झाले असून, या पदावर शासनाने अद्याप अधिकृतपणे कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. मात्र अकलूज नगर परिषदेत वारकरी संप्रदायात आपला ठसा उमटविलेले दयानंद गोरे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनचे शुभेच्छा फलक झळकले आहे तर संगमनेरच्या पोलीस खात्यातही बदलीच्या वाऱ्याचं तुफान उठल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत,
वैयक्तिक स्पर्धांमध्ये कठोर संघर्ष आणि विजय
सांघिक स्पर्धेतही एकहाती वर्चस्व:
या निर्णयाची सविस्तर माहीती देतांना आ.अमोल खताळ म्हणाले की, तालुक्यातील भोजापूर चारीचा प्रश्न चाळीस वर्षापासून प्रलंबित होता.महायुती सरकार सतेवर आल्यानंतर चारीची दुरुस्ती करण्यास प्राधान्य देवून प्रथम पाणी आणण्यात यश आले.या चारीच्या कामाला राज्य सरकारने १४कोटी रुपये मंजूर केले होते.महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमात नव्याने या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला,या प्रकल्पाच्या वितरण प्रणालीसाठी नव्याने ३०कोटी रुपये देण्याचा ऐतिहसिक निर्णय झाल्याने तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाचा मोठा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकर्यांना यापुर्वी फक्त आश्वासन मिळाले होते.मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष निधीची उपलब्धता करून कामाला सुरूवात होत असल्याने शेतकऱ्यांना नवा विश्वास महायुती सरकारने दिला.विधानसभा निवडणुकीपुर्वी पूर चारीला पाणी देणार हा दिलेला शब्द मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेला.आता नव्याने निधीची तरतूद करून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी मिळण्यासाठी महायुती सरकारने घेतलेला निर्णय या भागात सामाजिक परीवर्तन घडविण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास आ.अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
स्थानिकांच्या निवेदनांकडे दुर्लक्ष
नगरपालिकेच्या माध्यमातून काम
या कौतुकास्पद कामाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी, लखमीपुरा ट्रस्ट आणि परिसरातील स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत जावेद भाई जागीरदार यांचा सत्कार केला. यावेळी जिलानी शेख (बाबा भाई), शकुर शेख, रऊफ शेख, नासिर खान, परवेश सय्यद, अजिज शेख, मोबीन शेख, अशपाक शेख, मजहर भाई शिव सेना आणि अब्दुल बारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तर गुड्डू इंजिनिअर (मुजंम्मील शेख यांनी मा.जावेद भाई जहागीरदार यांचे समस्त समाजबांधवांच्या वतीने आभार देखील मानले आहे,
त्या माहितीनुसार, माहेगाव देशमुख शिवारातून गोदावरी नदीपात्रातून दोन टेम्पोमधून वाळूची अवैध वाहतूक केली जाणार होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल दिलीप विघे (वय २७) आणि कृष्णा संजय सोनवणे (वय २६) अशी आहेत. चौकशीत अमोल विघे हा टेम्पोचा चालक-मालक असल्याचे समोर आले, तर कृष्णा सोनवणेच्या टेम्पोचा मालक सचिन जाधव हा फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.या कारवाईत पोलिसांनी दोन्ही टेम्पो आणि त्यातील वाळू असा एकूण रु. २२,०९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.

यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर श्री. विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. अनंता जोशी व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. संदीप निमसे यांनी स्वतः लक्ष घालून कामकाज सुरळीत करावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.